केंद्रीय अर्थसंकल्प २०२५ वर राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची प्रतिक्रिया
देशातील मध्यमवर्गाला १२ लाख पर्यंतची करमुक्ततता, शेतकऱ्यांसाठी किसान क्रेडिट कार्डची मर्यादा वाढवून ५ लाख तसेच एक कोटी ७० लाख शेतकऱ्यांना ‘प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजने’चा फायदा, देशात हरित ऊर्जा, ईव्ही तसेच एआय तंत्रज्ञानाला मोठी चालना, डाळींच्या बाबत देश स्वयंपूर्ण करणे तसेच आगामी पाच वर्षात देशात वैद्यकीय शिक्षणाच्या ७५००० वाढीव जागा अशा देशातील प्रत्येक घटकाला भरभरून देत विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्याच्या दिशेने घेवून जाणारा सर्वंकष असा आजचा केंद्रीय अर्थसंकल्प आहे. – राज्यमंत्री माधुरी मिसाळ.